प्रशासक न्यूज,दि.२०मे२०२५
श्रीगोंदा शहरात काहीजण पडद्यामागे राहून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पुढे करून दमदाटी करून विशिष्ट समाजातील लोकांचा वापर करून जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या प्रकरणात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या खात्यातील काही कर्मचारीच या टोळीला पाठबळ देत असल्याची खळबळजनक माहिती आता समोर येत आहे.तसेच जागेची तस्करी करण्यासाठी काही टोळ्या आता नव्याने सक्रिय होत आहेत या व्यवसायात चांगला पैसा मिळत असल्यामुळे अश्या प्रकारे ताबेमारी करणाऱ्या काही नवीन टोळ्या आता तालुक्यात सक्रिय होण्यास सुरुवात झाली असून त्यांना वेळीच आवर घालणे जरुरी आहे नाहीतर इथून पुढ सामान्यांच्या जमींनी सोबतच बड्या लोकांच्या जमींनी सुद्धा या टोळीकडून अश्या प्रकारे मोठ्या प्रमाणात हडपल्या जाऊ शकतात हे लक्षात घेणे गरजेचे आहे
एखाद्या जागेवरून किंवा जमिनीवरून वाद असलेले प्रकरण त्या कार्यालयात गेले की सदर कर्मचारी त्याबाबतची माहिती जागा तस्करी करणाऱ्या टोळीला देतो अशी जोरदार चर्चा रंगत आहे त्यानंतर ती टोळी आपली यंत्रणा कामाला लावून मग अश्या जागा हडपण्यासाठी प्रयत्न करते त्यामुळेच अनेक प्रकरणात त्या कार्यालयात तक्रार करून सुद्धा काही उपयोग होत नसल्याचे लोक खासगीत बोलत आहेत परंतु अश्या प्रकारे ज्यांच्याकडून सामान्य लोकांना न्याय मिळण्याची अपेक्षा असते त्यातीलच कर्मचारी अश्या गुंड प्रवृत्तीला खतपाणी घालणार असतील तर सामान्य लोकांनी न्यायाची अपेक्षा नेमकी ठेवायची कुणाकडून असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे कायदा सुव्यस्थेची जबाबदारी असणारे कर्मचारी जर अश्या प्रकारे पैश्यांसाठी मिलिभगत करून गरिबांच्या जागा धनदांडग्याच्या घशात घालण्यासाठी मदत करत असतील तर हा प्रकार म्हणजे निश्चितच कुंपनाणे शेत खाल्ल्यासारखे आहे असं म्हणावं लागेल
शहरातील एका व्यक्तीला ऑनलाईन जुगारातून मिळणाऱ्या पैश्यांसाठी आपले बँक खाते वापरायला दिल्याबाबत करोडो रुपये माया मिळाली असून या प्रकरणात त्याच्यावर कारवाई साठी बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या पथकाला श्रीगोंद्यातील 'त्या' खात्यातील एका कर्मचाऱ्याने अनेकदा तडजोडी करत परत पाठवले त्यातून हा कर्मचारी सुद्धा मालामाल झाल्याची चर्चा आहे आणि यातूनच तो व्यक्ती आणि हा कर्मचारी यांच्यात चांगलीच मैत्री झाली असून अश्या प्रकारे जागेच्या प्रकरणात त्या व्यक्तीला हा कर्मचारी पाठबळ देत असल्याची सुद्धा जोरदार चर्चा आहे या प्रमाणेच काही राजकीय पार्शवभूमी असणारे काही लोक सुद्धा यात सक्रिय असल्याची खात्रीशीर माहिती समजली आहे
*त्या कर्मचाऱ्याच्या कारनाम्यांची खासगीत जोरदार चर्चा*
कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या सदर खात्यातील हा कर्मचारी पैश्यांच्या मोठ्या तडजोडी करण्यात माहीर असून आतापर्यत अनेक प्रकरणात त्याने मोठा मलिदा कामावल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे एवढेच नाही तर हा कर्मचारी एवढे कारनामे करत असताना याकडे त्याच्या खात्यातील वरिष्ठांचे दुर्लक्ष कसे? या कर्मचाऱ्याच्या या कारनाम्याला अजून कुणाचे पाठबळ आहे याबाबत सुद्धा अनेक चर्चा रंगत आहेत तरी तो कर्मचारी कोण याचा शोध घेऊन वरिष्ठानी त्याला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे
नागरिकांनी सुद्धा आता इथून पुढे जागेबाबत,जमींनीबाबत बेकायदेशीर पद्धतीने जर कुणी त्यांना धमकावत असेल तर त्यांनी न घाबरता पुढे येऊन या लोकांचा सामना करावा कायद्याची मदत घ्यावी
कुंपणच जेव्हा शेत खाते...... तालुक्याभोवती नव्या टोळीचा विळखा!
Reviewed by Prashasak
on
मे २०, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: