प्रशासक न्यूज,दि.१७मे२०२५
आपल्या हक्काचं घर बांधाव असं प्रत्येकाचं स्वप्न असत आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोलमजुरी करून कष्ट करून पै पै साचवून सामान्य माणूस घर बांधण्यासाठी जागा घेतो परंतु याच जागेवर दुसरे लोक येऊन दादागिरी करुन काही विशिष्ट समाजाच्या लोकांना पुढ घालून अधिकृत रित्या ज्या लोकांनी ती जागा विकत घेतली त्यांना तिथून हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न करतात अश्या वेळेस हे जागा मालक पोलिसांकडे जातात पण पोलीस देखील या लोकांना मदत करण्यासाठी हात वर करतात तेव्हा अश्या गरीब लोकांनी आपली हक्काची जागा वाचवण्यासाठी काय करायच असा प्रश्न आता या जागा मालकांना पडला आहे
आपल्या हक्काचे घर बांधण्यासाठी अश्या प्रकारे जागा खरेदी केलेल्या श्रीगोंद्यातील काहीजणांच्या या घराच्या स्वप्नाला आता ताबेमारीचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहे
दहा वर्षे्यांपूर्वी पैसे देऊन जागा विकत घेऊन त्याची खरेदी होऊन त्या जागेला कंपाऊंड केलेले असताना आता एवढी वर्षे उलटून गेल्यानंतर बाहेर गावातील काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी येऊन चालू वर्ष्याची नोटरी खरेदी खत आमच्याकडे आहे असे दाखवून ही जागा आमचीच आहे तुम्ही बाहेर व्हा असे त्या जागा मालकांना धमकावत आहे श्रीगोंदा शहरातील एका मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेबाबत हा प्रकार सध्या सुरु आहे जागा मालकांनी आम्ही दहा वर्षे्यांपूर्वी ही जागा खरेदी केली त्याचे खरेदीखत आमच्याकडे आहे आम्ही जागेला कंपाऊंड केले तेव्हा तुम्ही एवढे दिवस कुठं होता असे विचारले असता समोरच्या व्यक्तीने त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत त्या ठिकाणी एका विशिष्ट समाजातील लोकांना त्या जागेत आणून ठेवलं आहे त्यामुळे दहा वर्षे्यांपूर्वी ज्यांनी खरेदी केली होती त्या जागा मालकांपुढे आता काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे
अश्या प्रकारे गुंडगिरी करून विशिष्ट समाजाच्या लोकांना पुढ घालून ताबेमारीचे प्रकार श्रीगोंद्यात सुरु झाले असून यात प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे
*एकाच जागेचे दोन खरेदीखत कसे?
ही जागा ज्यांनी दहा वर्षे्यांपूर्वी विकत घेतली त्यांच्याकडे त्यावेळचे खरेदीखत असताना परत त्याच जागेचे चालुवर्षीचे खरेदीखत कसे असा प्रश्न उपस्थित होत.यावरून बोगस खरेदी खत केल्याचे दिसून येत आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे
*मास्टरमाईन्ड शोधणे गरजेचे*
शहरातील मोक्याच्या जागा शोधायच्या अश्या प्रकारे नोटरी किंवा खरेदीखत दाखवून जागा मालकांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांमार्फत धमकवायचं आणि तरी मालक ऐकले नाही तर विशिष्ट समज्याच्या लोकांना पैसे देऊन त्यांना त्या जागेत घुसवायचं आणि मुळ मालकाकडून जागा पदरात पाडून घ्यायची असे प्रकार श्रीगोंद्यात सुरु झाले असून ही गंभीर बाब आहे या मागचा मास्टर माईन्ड शोधून सर्वांसमोर आणणे गरजेचे आहे
*पोलिसांनी तक्रार घेऊन चौकशी करावी*
अश्या प्रकारे जागेवर दावा सांगितल्याच्या प्रकरणात पोलिसांनी संबंधित तक्रारदाराचा तक्रार अर्ज घेऊन खऱ्या प्रकाराची शहानिशा करणे गरजेचे आहे परंतु तसे होताना दिसत नाही पोलीस अश्या प्रकरणात आपली जबाबदारी झटकताना दिसत आहेत त्यामुळे ताबमारी करणाऱ्यांची हिंम्मत वाढत आहे
हा सर्व प्रकार अतिशय गंभीर असून या प्रकारांची सखोल चौकशी होऊन या ताबेमारीला वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे
श्रीगोंदेकर सावधान!शहरात सुरु झालाय हा गंभीर प्रकार....
Reviewed by Prashasak
on
मे १७, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: