प्रशासक न्यूज,दि.२६एप्रिल२०२५
पहलगाम मध्ये धर्म विचारून हिंदू लोकांना गोळ्या घालण्यात आल्या ही घटना निंदनीय आहे हिंदू संयमी आहे म्हणजे आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत हिंदू काय आहेत हे पाहायचं असेल ना तर कुंभमेळ्यातील फक्त नागासाधूच पाकिस्तानात सोडले तरी संपूर्ण पाकिस्तान हे हिंदू राष्ट्र होईल ही हिंदूंची ताकद आहे असे परखड मत रिल्स स्टार आणि कीर्तनकार ह.भ.प.संग्राम बापू भंडारे महाराज यांनी आज श्रीगोंद्यात बोलताना मांडले
श्रीगोंद्याचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज यांच्या जीर्णोद्धारासाठी मागील दहा दिवसांपासून श्रीगोंदा तहसील कार्यलयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे या आंदोलनाला आज भंडारे महाराज यांनी भेट दिली त्यावेळी त्यांनी आपले स्पष्ट विचार मांडलेआंदोलन स्थळावरून बोलताना भंडारे महाराज म्हणाले की,जीव देऊ पण महंमद महाराज यांचं मंदिर तिथंच बांधू मंदिराचा दर्गा होऊ देणार नाही,सोळाव्या शतकातच महंमद महाराजांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला होता त्यांच्या पुस्तकात सुद्धा हिंदू धर्माचाच प्रचार प्रसार करण्यात आलेला आहे त्यामुळे महाराज आज असते तर त्यांनी आपले आडनाव बदलून हिंदू धर्मातील आडनाव लावले असते महाराजांना भविष्यात काही धर्मांध लोक काफिर म्हणतील म्हणून आता जीव गेला तरी महाराजांच मंदिर बांधायचंय त्यासाठी बळी देण्याची वेळ आली तर पहिला बळी माझा द्या असे सांगत हिंदूंनी जागे होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले तसेच सरकार दरबारी मंदिरा च्या प्रश्नावर पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले
*मुस्लिम कीर्तनकारांनी आधी हिंदू धर्म स्वीकारावा*
जे मुस्लिम कीर्तनकार हिंदू धर्माप्रमाणे कीर्तन प्रवचन करतात त्यांनी उगाच फुशारकीच्या गप्पा न मारता आधी हिंदू धर्म स्वीकारावा हिंदू धर्माच आडनाव लावून घ्यावं मग कीर्तन कराव त्यांनी असं केल्यास आमच्या हिंदू मुलींसोबत तुमचे लग्न लावून देऊ आणि तस न झाल्यास गावकरी या मुस्लिम कीर्तनकारांना जे पाकीट देतात ते इस्लाम धर्माला दिल्यासारखं होईल अशी जहरी टीका भंडारे यांनी केली
*महाराजांचे दोन गट झालेत एक आपल्यासोबत तर दुसऱ्याला त्यांचे इस्लामिकरण करायचय*
शेख महंमद महाराज यांचे आता दोन गट झालेत त्यातील एक गट आपल्यासोबत आहे तर दुसरा गट आमीनभाई यांचा असून महाराजांच्या मंदिराला ते इस्लामिक मालमत्ता म्हणत आहेत त्यांना महाराजांचे इस्लामिकरण करायचे आहे असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदा करून वक्फ बोर्डाचे कंबर्डे मोडले आहे त्याबद्दल सर्वांनी मोदींचे आभार मानले पाहिजे त्या कायद्यामुळेच आमीन शेख आता गडबडले आहेत आणि इकडे तिकडे पळत आहेत अशी टीका भंडारे महाराज यांनी यावेळी केली
या प्रसंगी गोपाळराव मोटे,सुदाम तात्या झुंझरूक,पत्रकार शिवाजी साळुंके, घनश्याम शेलार,बाळासाहेब दुतारे, नानासाहेब कोथिंबीरे,विनोद डोळस,कालिदास कोथिंबीरे,आजिम जकाते,रियाज शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते
तर पाकिस्तान सुद्धा हिंदू राष्ट्र होईल... जीव गेला तरी मंदिराचा दर्गा होऊ देणार नाही!
Reviewed by Prashasak
on
एप्रिल २६, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: