बंद मागे,आंदोलन सुरु, त्या नोंदणीवरून नवा वाद..


प्रशासक न्यूज,दि.१९एप्रिल २०२५

श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न सुटण्याऐवजी तो जास्तच कठीण होत चालल्याचे पाहायला मिळत आहे त्याचे कारण म्हणजे आता या दर्गाह ट्रस्ट ची वफ बोर्डाकडे नोंद झाल्याची नवी माहिती काल रात्री समोर आली असून त्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे आणि सदर मंदिर निर्माणात मोठा अडथळा निर्माण झाला आहे ग्रामदैवताच्या मंदिर प्रश्नावर कुठलाही थेट तोडगा निघत नसल्यामुळे आणि यात्रा कमिटी आणि दर्गाह ट्रस्ट यांच्यात एकमत होत नसल्यामुळे श्रीगोंद्यात तहसील समोर सुरु करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन आज तिसऱ्या दिवशीदेखील सुरूच ठेवण्यात आलेले असले तरी गावबंद मुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन आणि बंद बाबत व्यक्त होणारा संताप आणि जनभावना लक्षात घेऊन बेमुदत गावबंद चा निर्णय मात्र मागे घेण्यात आला असून शहरातील सर्व व्यापार,दुकानें आज सुरळीत सुरु करण्यात आले मंदिराच्या मुद्द्यावर तसेच वफ बोर्ड आणि धर्मादाय आयुक्त यांच्याकडे महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट अशी असलेली नोंद रद्द होत नाही आणि बाकी अटी मान्य होत नाहीत तोपर्यत हे धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय यात्रा कमिटी व गावाकऱ्यांच्या बैठकीत आज घेण्यात आला त्याचप्रमाणे आमीन शेख एकीकडे मंदिराला विरोध नसल्याचे सांगून दुसरीकडे त्यांनी दर्गाह ची वफ बॉर्डकडे नोंद कशी लावली शेख हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचे आज सकाळी तहसील समोर झालेल्या बैठकीत आरोप करण्यात आला त्यामुळे आता जीर्णोद्धाराचा प्रश्न कसा सुटणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे

* वक्फ कडे नोंद झाल्याच्या माहितीमुळे नवा वाद आणि गोंधळ*
शेख महंमद दर्गाह ट्रस्ट ची वक्फ नोंद झाल्याची माहिती काल रात्री समोर आली तसा म्यासेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे मंदिर जीर्णोद्धार केला तरी त्यावर वफ बोर्डाची मालकी राहील यामुळे आता आधी ही नोंद रद्द करावी लागणार आहे त्यानंतरच मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळे धर्मादाय आयुक्त आणि वफ बोर्ड यांच्याकडे असलेली नोंद आधी रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी आता हे धरणे आंदोलन सुरु ठेवण्यात येणार आहे

*तरुणांनी घेतली आमदारांची भेट,बंद वरून मतभेद*
दोन दिवस गावबंद ठेवून काहीच मार्ग निघत नसल्यामुळे आणि या गावबंद मुळे सर्वसामान्य व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे काल रात्री शहरातील शेकडो तरुणांनी शहरातील आमदारांच्या माऊली या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन मंदिर प्रश्नावर तोडगा काढण्याची व गावाबंद चा निर्णय मागे घेण्याची आमदार विक्रम पाचपुते यांना विनंती केली त्यावेळी पाचपुते यांनी यात्रा कमिटी व दर्गाह ट्रस्ट दोघेही माहिती लपवत असल्याबाबत नाराजी व्यक्त करत आमदार म्हणून आपण शासन दरबारी मंदिरासाठी प्रयत्न करू असे आश्वासन तरुणांना देत गावबंद चा निर्णय या बैठकीत मागे घेण्यात आला
दोन दिवस गावबंद ठेवुनही कुठलाच मार्ग न निघाल्यामुळे सोशल मीडियावर या बंद बाबत काहींनी संताप व्यक्त केला त्यामुळे या बंद वरून मोठे मतभेद पाहायला मिळाले

*वफ्फ बोर्डाकडील नोंदीवरून बजरंग दल आक्रमक*
शेख महंमद बाबा दर्गाह ची नोंद वफ्फ बोर्डाकडे झाल्याची माहिती काल रात्री समोर येताच बजरंग दल आता आक्रमक झाले असून ही नोंद रद्द करून मंदिर निर्माणात शेख कुटुंबाने सहकार्य करावे अन्यथा बजरंग दल आक्रमक भूमिका घेणार असल्याची प्रतिक्रिया बजरंग दल अध्यक्ष कालिदास कोथिंबीरे यांनी दिली आहे
त्यामुळे आता हा प्रश्न कसा सुटणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे


बंद मागे,आंदोलन सुरु, त्या नोंदणीवरून नवा वाद.. बंद मागे,आंदोलन सुरु, त्या नोंदणीवरून नवा वाद.. Reviewed by Prashasak on एप्रिल १९, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.