प्रशासक न्यूज,दि.१२एप्रिल२०२५
विशाल अ चव्हाण
लोकसभा निवडणूक होऊन एक वर्षे पूर्ण होत आले लोकसभा निवडणुकीत श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने खासदार निलेश लंके यांच्या पारड्यात भरभरून मते टाकून अटीतटीच्या लढाईत लंकेंच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला परंतु असे असूनसुद्धा खासदार लंके यांनी मताधीक्य दिलेल्या श्रीगोंदा तालुक्याकडेच दुर्लक्ष केल्याचे सध्या पाहायला मिळत आहे
लोकसभा निवडणुकी आधी श्रीगोंद्याशी प्रचंड जनसंपर्क ठेवणारे निलेश लंके आता मात्र तालुक्यात फारसे दिसत नाहीत तसेच मागील एक वर्ष्याच्या कालावधीत त्यांच्याकडून श्रीगोंदा तालुक्याला कुठला भरीव निधी किंवा त्यांच्या माध्यमातून कुठले काम झाल्याचे पाहायला मिळत नाही कुकडीच्या पाणी प्रश्नात खासदार लंके यांनी शेतकऱ्यांच्या सोबत उभे राहून त्यांच्या सोबत आंदोलन उभे करणे गरजेचे होते परंतु तसे होताना दिसले नाही वर्षेभरात खासदारांनी तालुक्यात एक शासकीय आढावा बैठक घेतली पण त्यातून कुठले काम मार्गी लागले हा प्रश्न अनुत्तरीत आहे या आढावा बैठकीत त्यांनी काही प्रश्नांबाबत प्रशासनाला सूचना केल्या होत्या परंतु ते प्रश्न अजूनही जैसे थेच आहेत त्याबाबत लंके यांच्या कडून कुठलाही पाठपुरावा झाल्याचे दिसले नाही तसेच आढळगाव येथील राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत अधिकाऱ्यांनी लंके यांना लेखी आश्वासन देऊन सुद्धा तो प्रश्न मार्गी लागलेला नाही त्यामुळे खा. लंके यांच्या या दुर्लक्षीत पणामुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे या बाबत खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता संपर्क झाला नाही
*प्रचारात अग्रेसर असणारे स्टार प्रचारकच आता विरोधात*
मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी खासदार सुजय विखे यांच्या विरोधात प्रचाराच्या वेळी आपल्या भाषणातून रान पेटवत खासदार निलेश लंके यांच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडणारे आणि लंके यांचे त्यावेळी स्टार प्रचारक असणारे जि.प चे माजी सदस्य अनिल ठवाळ आणि सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस हेच आता लंके श्रीगोंद्यात लक्ष देत नसल्याबाबत आणी निवडणुकीतील आश्वासनांचा त्यांना विसर पडल्याबाबत जाहीर भाषणातून आणि सोशल मीडियातून जाहीर नाराजी व्यक्त करत आहेत यांच्या प्रमाणेच लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे अनेक जण खासदार लंके यांनी श्रीगोंद्याकडे लक्ष देत नसल्याबाबत खासगीत नाराजी व्यक्त करत आहेत
*कालवा फोडण्याची घोषणा फक्त चुनावी जुमलाच*
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी न मिळाल्यास खासदार झाल्यावर आपण शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी वेळ पडली तर कुकडी कालव्याला सुरुंग लावून तो फोडून देऊ अशी भाषा करणारे खासदार लंके हे मात्र प्रत्यक्षात आता तालुक्यातील शेतकऱ्यांना कुकडीच्या पाण्यापासून वंचित राहावे लागलेले असताना तेव्हा मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने कुठली ठोस भूमिका घेताना दिसले नाहीत शेतकऱ्यांनी पाण्यासाठी केलेल्या आंदोलनात देखील ते कुठे सहभागी झाले नाहीत त्यामुळे पाणी मिळवून देण्यासाठी कालवा फोडू हा फक्त चुनावी जुमला आणि राजकीय घोषणाच ठरल्याचे पहायला मिळत आहे
*खासदारांनी अपेक्षा भंग केला... अनिल ठवाळ,माजी जि.प सदस्य*
निलेश लंके हे शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतील म्हणून आपण त्यांच्यावर भरवसा ठेवून त्यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली परंतु निवडून आल्यानंतर मात्र खासदार लंके यांना त्यांच्या आश्वासनांचा विसर पडला आहे त्यांनी तालुक्यातील लोकांचा अपेक्षाभंग केला आहे अजून वेळ गेलेली नाही खासदारांनी आपल्या कामात सुधारणा करून श्रीगोंदा तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे
माजी खासदार डॉ सुजय विखे हे ठराविक कार्यकर्त्यांच्या गराड्यात फिरतात थेट सामान्य लोकांशी ते संपर्क ठेवत नाहीत कुणाचा फोन उचलत नाहीत या गोष्टींमुळे विखे यांना लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता त्यामुळे विखे यांना पराभूत करून श्रीगेंदेकर जनतेने निलेश लंके यांच्यावर विश्वास ठेवत निवडून दिले परंतु आता निवडून आल्यानंतर मात्र लंके हे देखील विखे यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत असल्याचे दिसत आहे तसेच त्यांचे श्रीगोंद्याकडे झालेले दुर्लक्ष कमी झालेला जनसंपर्क यामुळे लोकांमधून नाराजीचा सूर आहे
खासदार लंके हे विरोधी पक्षाचे खासदार असल्यामुळे त्यांना काम करण्यावर मर्यादा असल्या तरी त्यांनी कुकडीचा पाणी प्रश्न किंवा इतर महत्वाच्या प्रश्नांवर इथून पुढच्या काळात तरी तालुक्यात संपर्क ठेवून इथल्या लोकांसोबत उभे राहून जनआंदोलन उभारून प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांनी निवडणुकीत श्रीगोंदेकरांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे
मताधीक्य देणाऱ्या श्रीगोंद्याकडेच खासदारांचे दुर्लक्ष!
Reviewed by Prashasak
on
एप्रिल ११, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: