प्रशासक न्यूज,दि.१४एप्रिल२०२५
श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे शेख महंमद महाराज बुवा ट्रस्ट चे शेख महंमद बाबा दर्गाह करून त्याचे अध्यक्ष आमीन शेख हे गावाकऱ्यांच्या भावना दुखवत आहेत आडमुठे पणाची भूमिका घेऊन ते मंदिराच्या निर्माणात अडथळा निर्माण करत आहेत याबाबत गावाकऱ्यांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त करून त्याचा निषेध व्यक्त करत येत्या गुरुवारी दि.१७रोजी श्रीगोंदा बसस्थानक ते श्रीगोंदा तहसील कार्यलयावर आध्यात्मिक मार्गाने हजारो टाळकरी,भजनी, वारकरी यांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा आणि बेमुदत गाव बंद ठेवून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आज श्रीगोंदा शहरात रत्नकमल मंगल कार्यालयात गावकरी आणि प्रमुख नेते यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या नियोजन बैठकीत घेण्यात आला तसेच या मोर्चात तालुक्यातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहण्याची ग्वाही आजिम भाई जकाते यांनी दिली मुस्लिम समाज गावाकऱ्यांसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
यावेळी गावाकऱ्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारात अडथळा आणणाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत कुठल्याही परिस्थितीत मंदिर निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला यावेळी गावाकऱ्यांच्या भावना संतप्त होत्या तसेच यावेळी सर्व मुस्लिम समाजाचे आभार मानत हा हिंदू मुस्लिम वाद नसून एका कुटुंबा कडून जाणीवपूर्वक मंदिराच्या जीर्णोद्धारात होणाऱ्या अडवणूकीचा वाद असल्याचे सर्वांनी स्पष्ट करत हा एकोपा कायम टिकून राहील असे देखील सांगितले
शेख महंमद बाबा दर्गा ट्रस्ट चे अध्यक्ष आमीन शेख यांनी श्रीगोंदा तहसीलदारांना पत्र देत त्यात यात्रा कमिटीतील सदस्यांना गुंड आणि खंडणी खोर असा उल्लेख करत आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे त्या पत्राचा निषेध व्यक्त करत अशोक आळेकर यांनी बैठकीसाठी उपस्थित ग्रामस्थांसमोर हे पत्र वाचून दाखवले
या बैठकीला आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी मंत्री बबनराव पाचपुते,बाबासाहेब भोस,घनश्याम शेलार यांच्यासह यात्रा कमिटीचे सदस्य आजी माजी नगरसेवक,विविध पक्षाचे पदाधिकारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नानासाहेब कोथिंबीरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
या बैठकीचे प्रस्ताविक करताना घनश्याम शेलार यांनी आमीन शेख यांची वागणूक ही हिंदू आणि इस्लाम धर्माला सोडून ती तालीबानी विचारसरणीची वागणूक असल्याची कडक शब्दात टीका केली तसेच आतापर्यत गावाकऱ्यांनी संयमी भूमिका घेतली पण शेख हे वाद निर्माण होईल असे सतत वर्तन करत आहेत,ते महाराजांचे वंशज असल्याचा कोणताच पुरावा त्यांच्याकडे नाही मंदिरात होत असलेल्या अन्नदानास,पारायण सोहळ्यास त्यांचा विरोध आहे दैवत मोडून काढून त्यांना दर्गाह करायचंय, महाराजांच त्यांना इस्लामी करण करायच असल्याचा आरोप शेलार यांनी करत येत्या गुरुवारी हजारोचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच मंदिरात आधीपासून पारायण सोहळा व सप्ताहाचे आयोजन करण्यात येते परंतु त्याला छेद देण्यासाठी शेख यांनी जाणीवपूर्वक मंदिरात कव्वा लीचा कार्यक्रम सुरु केला आहे त्यावर शेलार यांनी आक्षेप नोंदवत शेख हे वातावरण खराब करत असल्याचा आरोप केला
यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी तुम्ही घ्याल ती भूमिका मान्य असेल पण शांत डोक्याने आणि संयमाने निर्णय घ्यावा लागेल फक्त चर्चा करून प्रश्न सुटणार नाही तर मंदिर निर्मणासाठी ठाम निश्चय करावा लागेल वाद घालण हा श्रीगोंदेकराचा पिंड नाही कायद्याचा अभ्यास करून पुढील निर्णय घ्यावा लागेल असे सांगत जेष्ठ नेते जो निर्णय घेतील त्या सोबत आपण सर्व राहू असा विश्वास आमदार पाचपुते यांनी व्यक्त केला
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मी आमदार असताना मंदिरा बाबत मोठी भूमिका घेतली होती आता विक्रम पाचपुते आमदार आहेत त्यांना मोठी भूमिका घ्यावी लागेल कुठलीही मदत लागली तरी आपण सोबत आहोत असे मत त्यांनी मांडले
जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी आंदोलना बाबत भूमिका मांडत आतापर्यत संयम खूप बाळगला पण आता टोकाची भूमिका घ्यावी लागेल असे मत मांडले
यावेळी बापुशेठ माने यांनी आमीन भाई यांनी सर्वांची माफी मागून दोन पाऊले मागे सरकून गावाकऱ्यांसोबत यावे असे मत मांडले तर सुभाष महाराज आळेकर आणि बंटी शेठ बोरुडे यांनी मंदिर निर्माण होण्यावर तोडगा निघत नाही तोपर्यत मंदिरच बंद ठेवा अशी तीव्र भावना मांडली तर संतोष खेतमाळीस,नंदकुमार ताडे यांनी कठोर शब्दात मंदिर जीर्णोद्धारासाठी संयमी भूमिका सोडून थेट भूमिका घ्या आम्ही अंगावर गुन्हे घेतो असे मत मांडले,बजरंग दलाचे अध्यक्ष कालिदास कोथिंबीरे यांनी हा मुस्लिम समाजाला विरोध नाही प्रवृत्तीला विरोध असून मंदिर निर्मा णासाठी एक बिगर राजकीय त्रयस्थ कमिटी नेमण्याची सूचना केली आणि जिथं बजरंग दलाची आवश्यकता असेल तिथे आम्हाला सांगा आम्ही गुन्हे अंगावर घ्यायला तयार असल्याचे स्पष्टपणे सांगितले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कांतीलाल कोथिंबीरे यांनी देवाच्या मंदिरासाठी मोर्चा काढावा लागतो ही दुर्दैवी बाब असल्याचे मत व्यक्त केले तसेच हा लढा मुस्लिम समाजाविरोधात नाही मुस्लिम समाज गावासोबत आहे अशा भावना यावेळी वक्त्यांनी व्यक्त केल्या महंमद महाराजांचे खरे वंशज आय्याज शेख हेच असल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले स्वतः अय्याज शेख यांनी आपण मंदिराच्या जीर्णोद्धारात गावाकऱ्यांसबोत असल्याचे स्पष्ट केले
यावेळी सुनीता शिंदे,राजू गोरे,प्रा.संजय लाकूडझोडे सर,संतोष खेतमाळीस,आजिम जकाते,एम डी शिंदे,नंदकुमार ताडे,एकनाथ आळेकर,अरविंद कापसे,प्रदीप खामगळ,मीराताई शिंदे,आय्याज भाई शेख,दिलीप डेबरे,ज्योतीताई खेडकर,भूषण महाराज यांची भाषणे झाली
मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी आता गावकरी आक्रमक झाले असून गुरुवारी होणाऱ्या मोर्चात काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे
ग्रामदैवताच्या मंदिरासाठी गावकऱ्यांचा एल्गार!
Reviewed by Prashasak
on
एप्रिल १४, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: