'तो' अपघात नव्हे तर घातच,.... 'त्या' घटनेबाबत सुरु असलेली दिशाभूल थांबवावी!


प्रशासक न्यूज,दि.२फेब्रुवारी२०२५

श्रीगोंदा शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या दगडफेकीत रामभाऊ शंकर ससाणे रा ससाणेनगर यांचा मृत्यू झाला होता परंतु काहीजण या घटनेबाबत दिशाभूल करत असून या घटनेला अपघाता चे स्वरूप देत आहेत परंतु तो अपघाती मृत्यू नाही तर तो घातच असल्याचा आरोप ससाणे नगर येथील त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या आणि त्या दगडफेकीत जखमी झालेल्या काही तरुणांनी केला आहे एवढेच नाही तर पीडित कुटुंबं आणि इतर प्रत्यक्षदर्शीवर या प्रकरणात काहीजण दबाव टाकून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील या तरुणांनी आज श्रीगोंदा शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला
या पत्रकार परिषदेसाठी विकी विठ्ठल ससाणे,संदीप लक्ष्मण ससाणे,मयूर शंकर ससाणे,साहिल श्याम ससाणे,ओम दिलीप ससाणे,यश नितीन ससाणे,प्रेम शंकर ससाणे,प्रेम दीपक ससाणे,ओमकार सुनील लोखंडे,सोहंम रुपचंद ससाणे,प्रथमेश राम ससाणे,ओम संतोष सकट,गौरव संतोष जगताप,अविनाश घोडके,रोहन मछिंद्र ससाणे,ओम ससाणे उपस्थित होते

पीडित कुटुंबाला समाज कल्याण विभागामार्फत मदत मिळावी,या प्रकरणातील फरार आरोपीना अटक करावी आणि अटक आरोपीना शिक्षा व्हावी, पीडित कुटुंबाला संरक्षण मिळावे पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालावे अश्या मागण्या करण्यात आल्या तसेच फरार आरोपी अटक न केल्यास ४तारखेला उपोषण करण्याचा ईशारा या तरुणांनी दिला

मंत्री नितेश राणे यांच्या श्रीगोंदा दौऱ्याबाबत विचारले असता राणे हे पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी येत आहेत त्यामुळे त्यांचे आम्ही स्वागतच करू असे देखील मत या तरुणांनी यावेळी व्यक्त केले तसेच हिंदू मुस्लिम समाजात एकोपा टिकून रहावा असे आमचे सुद्धा मत आहे परंतु या दगडफेकीच्या घटनेबाबत सुरु असलेली दिशाभूल थांबवून दोषींवर कडक कारवाईची मागणी या तरुणांनी केली

 एकाच घटनेबाबत वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाल्यामुळे या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे




'तो' अपघात नव्हे तर घातच,.... 'त्या' घटनेबाबत सुरु असलेली दिशाभूल थांबवावी! 'तो' अपघात नव्हे तर घातच,.... 'त्या' घटनेबाबत सुरु असलेली दिशाभूल थांबवावी! Reviewed by Prashasak on फेब्रुवारी ०२, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.