जमत नसेल तर माल परत घेऊन जा... व्यापाऱ्याची शेतकऱ्याला अरेरावी!


प्रशासक न्यूज,दि.६फेब्रुवारी२०२५

शेतकरी कष्टाने आपला शेतमाल पिकवतो पण त्याला स्वतःला तो माल विकता येत नाही म्हणून शेतकरी आपला शेतमाल कृषीउत्पन्न बाजारसमितीत विक्रीसाठी नेतो पण तिथे सुद्धा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दुय्यम वागणूक मिळते

श्रीगोंद्यातील कृषीउत्पन्न बाजारसमिती मध्ये एका शेतकऱ्याला असाच अनुभव आलाय

बाळु धुळाजी कोथिंबिरे या शेतकऱ्याने त्यांच्याकडील १०गोण्या तूर बाजारसमितीमधील भावेश ट्रेडिंग कंपनी यांच्याकडे विक्रीसाठी नेली तेव्हा प्रत्येकी एक किलो प्रमाणे त्यांच्या दहा गोण्यामागे दहा किलो तूर कट करून त्यांनी जमा करून घेतली त्यानंतर तुरीचे पैसे मागितल्यानंतर पैसे देण्यास नकार देऊन तूला घरी येऊन सांगायचं होत का पैसे नाहीत म्हणून जमत नसेल तर तूर भरून घेऊन जा माझ्याकडे पैसे आल्यावर देईल अशी अरेरावीची भाषा त्यांनी सदर शेतकऱ्यास वापरली त्यानंतर कोथिंबीरे या शेतकऱ्याने बाजारसमितीचे सभापती, सहायक निबंधक यांच्याकडे या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली आहे

त्यावर आता संबंधिताकडून या व्यापाऱ्यावर काय कारवाई होते शेतकऱ्याला न्याय मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे
जमत नसेल तर माल परत घेऊन जा... व्यापाऱ्याची शेतकऱ्याला अरेरावी! जमत नसेल तर माल परत घेऊन जा... व्यापाऱ्याची शेतकऱ्याला अरेरावी! Reviewed by Prashasak on फेब्रुवारी ०५, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.