प्रशासक न्यूज,दि.१४जानेवारी२०२५
भारत हा पुरुषप्रधान देश त्यामुळे महिलांना कोणत्या ना कोणत्या कारणाने कमी पणाची वागणूक दिली गेली महिला म्हणून तिच्यावर अनेक बंधने लादली गेली आज महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम करतात असे म्हंटले जात असले तरी खरच अजून महिलांना पूर्ण स्वातंत्र्य आणि बरोबरीचा दर्जा मिळालाय का हा ही एक प्रश्नच आहे
आजही महिलांवर रूढी,परंपरेच्या नावाखाली अनेक जाचक अटी, नियम घालण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे या नियमांचे महिलांकडूनच काटेकोर पणे पालन होताना दिसत आहे त्यातच विधवा महिलांकडे बघण्याचा इतर महिलांचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही चांगल्या कार्यक्रमाला अश्या महिलांना बोलावणे टाळले जाते परंतु आपण फक्त सुशिक्षित झालो असे म्हणून चालणार नाही तर या जुन्या रूढी बदलायला हव्यात
श्रीगोंद्यात आज मकरसंक्रांतीचे औचित्य साधत याच जुन्या आणि चुकीच्या रूढीला छेद देण्याचा एक आदर्श आणि क्रांतिकारी प्रयत्न सामाजिक कार्यकर्त्या सौ चांदणी ताई खेतमाळीस यांनी केला आहे शहरातील श्रीमती मीराताई शिंदे,श्रीमती सोनालीताई शिंदे,श्रीमती आरतीताई रणसिंग या विधवा महिलांना चांदणी ताई यांनी आज वाण लुटण्यासाठी मंदिरात बोलावून त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना इतर सुवासीनी स्त्रियांप्रमाणेच बरोबरीचा दर्जा देण्याचा एक क्रांतिकारी उपक्रम त्यांनी राबवला या उपक्रमाचे कौतुक होत आहे तसेच याचा आदर्श इतर महिलांनी घेणे गरजेचे आहे
क्रांतिकारी निर्णयात बंड करून सहभाग घेतला याचा आनंद/शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीराताई शिंदे
सर्व स्त्रियांना समान वागणूक मिळण्याच्या दृष्टिकोनातून आज चांदणी ताई खेतमाळीस आणि सविता ताई गांजुरे यांनी पुढाकार घेत एक क्रांतिकारी निर्णय घेतला त्या धाडसाला प्रतिसाद म्हणून आम्ही आज समाजाने पिढ्यानं पार विधवा महिलांवर लादलेल बंधन झुगारुन लावले याचा मनापासून आनंद आहे आम्ही जिजाऊ,सावित्रीच्या लेकी आहोत इथून पुढे विधवा महिलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना इतर स्त्रियांप्रमाणेच वागणूक मिळण्यासाठी प्रयत्न करणार
श्रीगोंद्यातील 'त्या' क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत,विधवा महिलांना...!
Reviewed by Prashasak
on
जानेवारी १४, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: