आता परिवर्तन अटळ,जनता कारभारी बदलण्याच्या तयारीत,नागवडे कुटुंबाला जोरदार प्रतिसाद/-राजेंद्र नागवडे


प्रशासक न्यूज,दि.३१ऑक्टोबर२०२४

८० च्या दशका पर्यंत स्व.शिवाजी राव नागवडे यांनी दुष्काळी आणि खाजगी साखर कारखान्याच्या मनमानी कारभाराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना साखर कारखान्याचा मालक बनवून तसेच पाटपाणी उपलब्ध करून शिक्षणाची सुविधा तालुक्यात सुरू करून विकसित श्रीगोंदा तालुक्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण केले पण पुढे ४० वर्षे केवळ घोषणा आणि गलथान कारभारामुळे श्रीगोंदा मतदार संघात विकास केवळ कागदावर राहिला असा आरोप नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केला आहे
कुकडी प्रकल्प पूर्ण झाल्यावर बागायती क्षेत्र वाढले पण दरवर्षी उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने टँकरने पाणी द्यावे लागते तर काहींनी बागा मोडून टाकल्या

साकळाई प्रश्न आणि एमआयडीसी फक्त कागदावरच 
एमआयडीसीचे स्वप्न तालुक्याच्या आमदारांनी अनेकदा दाखवले काही गावांचे नकाशे दाखवले पण आजही ही योजना कागदावरच आहे आजही तालुक्यातील कुशल,अकुशल कामगार नगर,कुरकुंभ, कारेगाव,रांजणगाव येथील एमआयडीसी मध्ये कामाला जाताना दिसतो उद्या यात कर्जतच्या एमआयडीसी ची भर पडली तर नवल वाटायला नको. साकळाई उपसा जलसिंचन योजना देखील कागदावरच आहे अनेकांनी घोषणा केल्या सर्व्हे देखील झाला पण कोळगाव,चिखली आणि नगर तालुक्यातील या योजनेच्या लाभक्षेत्र मध्ये येणारी गावे आजही तहानलेली आहे 

*श्रीगोंद्याची जनता कारभारी बदलाच्या प्रतीक्षेत*
या सर्व दुर्लक्ष कारभारामुळे श्रीगोंदा तालुक्यातील जनता आता तालुक्याचा कारभारी बदलण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे राजेंद्र नागवडे यांनी सांगितले तसेच लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आला विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होणार असल्याने श्रीगोंद्यात भाजप आता उमेदवार बदलाच्या तयारीत आहे पण विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक,शेतमजूर,शेतकरी या राजकीय अनास्थेला वैतागला आहे म्हणून परिवर्तन अटळ आहे असे राजेंद्रदादा नागवडे यांनी म्हंटले आहे

श्रीगोंदा तालुका वेगाने वाढत आहे पण रस्त्यांची दुरवस्था कायम आहे मध्यंतरी कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या निविदा निघाल्या कामे सुरू झाली पण टक्केवारीचा खेळ सुरू झाला आणि रस्त्यावरचे डांबर खडी घेऊन बाहेर पडले पुन्हा रस्त्यांची दुरवस्था सुरू झाली आहे .

पाण्याचे न्याय वाटप,विसापूर खालील ८ गावांचा समावेश,वितरिका क्रमांक १० ची मंजुरी, डिंभे - माणिकडोह बोगदा,टेल टू हेड आवर्तन मधील श्रीगोंदा तालुक्या वरील अन्याय हे सारे प्रश्न आजही भेडसावत आहेत यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. यात कहर म्हणजे नगर - दौंड रस्त्यावरील टोल नाका परिसरातील वाहन चालकांना यातून सुट न दिल्याने नाराजी आहे निवडणूक डोळ्या पुढे ठेऊन महिनाभर टोल वसुली बंद आहे पण पुढे काय ? हा प्रश्न स्थानिकांना आहे 

कोरोना काळात लोकप्रतिनिधी कोविड सेंटर सुरू करण्याऐवजी स्वस्थ बसले नागरिक आपल्या परीने उपचारासाठी इतरत्र धावपळ करत होते पण लोकप्रतिनिधी मौन बाळगून बसले सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना मार्फत चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी कोवीड सेंटर सुरू केले.

*शासकीय कार्यालयात नागरिकांची हेळसांड,लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष*
गेल्या ५ वर्षात नागरिक विविध दाखले,रेशनिंग कार्ड,साठी शासकीय कार्यालयात धावपळ करत राहिले पण प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी यांना लोकप्रतिनिधी जाब विचारू शकले नाही,सर्वच शासकीय कार्यालयात नागरिकांना पैसा आणि वेळ खर्च करावा लागला आमदारांच्या अनास्थेपणामुळे तालुक्यातील जनता वाऱ्यावर सोडली गेली आहे शासकीय कार्यालयात जनतेची हेळसांड होत असल्याचा आरोप राजेंद्र नागवडे यांनी केला आहे 

उपजिल्हा रुग्णालयाचा मुद्दा जैसे थेच 
श्रीगोंद्या पेक्षा भौगोलिक आणि लोकसंख्येने कमी असलेल्या कर्जत मध्ये अद्यावत शासकीय रुग्णालय असताना श्रीगोंदा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय मात्र कागदावरच राहिले आजही सोनोग्राफी,सिझर साठी श्रीगोंद्यातील रुग्णांना खाजगी दवाखाने किंवा दौंड,शिरूर,नगरला धाव घ्यावी लागते,आरोग्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे

पोलीस वसाहतीचा प्रश्न दुर्लक्षीतच
श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्मचारी वसाहत नाही,पोलीस ठाणे ब्रिटिश कालीन जुन्या तहसील कार्यालयात कामकाज पाहत आहे इतर तालुक्यात झपाट्याने कायापालट होत असताना श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात याचा प्रत्यय येत आहे त्यामुळेच या मतदार संघात केवळ आमदाराचे पुत्र सर्व्हे मध्ये मागे पडले नाही तर भाजपच मागे पडली आहे.जनतेला आता बोले तैसा चाले याप्रमाणे शेतकरी,शेतमजूर,रुग्ण,विद्यार्थी यांच्यासाठी झटणारे नागवडे कुटुंबाला मतदार संघात प्रतिसाद मिळत आहे अस म्हटल्यास वावगे ठरू नये असेही मा. राजेंद्रदादा नागवडे यांनी शेवटी म्हंटले आहे.







आता परिवर्तन अटळ,जनता कारभारी बदलण्याच्या तयारीत,नागवडे कुटुंबाला जोरदार प्रतिसाद/-राजेंद्र नागवडे आता परिवर्तन अटळ,जनता कारभारी बदलण्याच्या तयारीत,नागवडे कुटुंबाला जोरदार प्रतिसाद/-राजेंद्र नागवडे Reviewed by Prashasak on ऑक्टोबर ३०, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.