'अबब' कोट्यावधी रुपयांची अफरातफर झाल्याची श्यक्यता चौकशीची मागणी


प्रशासक न्यूज,दि.३ऑगस्ट२०२४

श्रीगोंदा तालुक्यातील राजापुर वि.का.सेवा सोसायटीच्या २०१६ ते २०२२ या कालावधीत झालेल्या दफ्तरी कामकाजाची फेरतपासणी करण्याची मागणी चेअरमन श्रीपाद कवास्ते,व्हा-चेअरमन महादेव शेळके आणि संचालक मंडळाने केली आहे. यामध्ये विविध आर्थिक अनियमितता आणि त्रुटी आढळून आल्याची त्यांनी माहिती दिली आहे. संस्थेच्या पातळीवर तपासणी करताना सभासदांच्या थकबाकीची स्थिती: दुसऱ्या सोसायट्यांमध्ये वर्ग केलेल्या सभासदांची थकबाकी राजापुर सोसायटीमध्ये आहे.

सोसायटीचे कामकाज पाहताना संचालक मंडळाच्या लक्षात आले की, सोसायटीचे सभासद व बँकेकडे असलेले सोसायटीचे येणे-देणे यामध्ये मोठी तफावत आहे. सदर कालावधीमध्ये सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांची अनियमितता आढळली आहे. तसेच, सोसायटीच्या दफ्तरातील कामकाजामध्ये अफरातफर झाल्याचे दिसून आले आहे.तसेच,कर्ज भरताना त्रुटी: काही सभासदांनी कर्ज भरले असूनही त्यांना निल दाखले दिले गेले आहेत., कर्ज माफीची स्थिती: २००८-२००९ मध्ये काही सभासदांना कर्ज माफी झाली होती. त्यांची थकबाकी अद्याप कर्ज व सुलझलेली नाही., अनियमित कर्ज वाटप: कर्ज खात्यांमध्ये ३०९ कर्ज खाती नसलेल्या सभासदांची थकबाकी सापडली आहे., क्षेत्रानुसार कर्ज वाटप: क्षेत्र कमी असलेल्या सभासदांना अधिक कर्ज वाटप करण्यात आले आहे., कर्ज माफीचे परिणाम: २०१९ मध्ये कर्ज माफी झालेल्या सभासदांच्या थकबाकीचा तपास करणे बाकी आहे., डबल कर्ज दाखवणे: काही सभासदांचे नाव डबल कर्ज दाखवण्यात आले आहे., कर्ज वसुलीची स्थिती: २००८, २००९, २०१७, २०१९ कर्ज माफी झाली परंतु काही सभासदांचे कर्ज वसुल झालेले नाही., कुकडी साखर कारखाना शेअर्स: २००४ पासून कुकडी साखर कारखानाच्या शेअर्सची वसुली झालेली नाही., वर्ष २०२२ मधील व्याज भरणा: २०२१-२२ मध्ये व्याज भरणा अपूर्ण आहे., लिखित खतावणीमधील त्रुटी: संस्थेचे लिखित खतावणीमधे अपूर्ण माहिती आहे., संगणिकरणाच्या स्थिती: २०१५-१६ पासून संगणिकरणात त्रुटी आढळल्या आहेत.

राजापुर वि.का. सेवा सोसायटीमध्ये झालेल्या या अनियमितता आणि त्रुटींच्या तपासणीसाठी संस्थेने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, श्रीगोंदा यांच्याकडे फेरतपासणीची मागणी केली आहे. सोसायटीच्या संचालक मंडळाने या प्रकरणाचा सखोल तपास करुन, यातील दोषींवर आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.

याप्रकरणी निवेदन देताना राजापूर सोसायटी संचालक मंडळ (सन २०२२ ते २०२७) मधील श्री श्रीपाद कवास्ते (चेअरमन), महादेव शेळके (व्हाईस चेअरमन), आप्पासाहेब रसाळ (संचालक), युवराज थेऊरकर (संचालक), बाळासाहेब शेळके (संचालक), गोरख पोटावले (संचालक), कांतीलाल वीर (संचालक), राजाराम ढवळे (संचालक), सागर धावडे (संचालक), संजय गव्हाणे (संचालक), रघुनाथ मोरे (संचालक), सौ. अंजनाबाई धावडे (संचालिका), सौ. अंजुबाई धावडे (संचालिका), सुभाष व्यवहारे (स्वी.संचालक), सर्जेराव वीर (स्वी.संचालक) इत्यादींनी निवेदनावर सह्या केल्या असून, सहाय्यक निबंध थोरात यांना निवेदन देताना यातील बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते.




'अबब' कोट्यावधी रुपयांची अफरातफर झाल्याची श्यक्यता चौकशीची मागणी 'अबब' कोट्यावधी रुपयांची अफरातफर झाल्याची श्यक्यता चौकशीची मागणी Reviewed by Prashasak on ऑगस्ट ०३, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.