लाखो रुपये दिले एजंटला,तरी 'नवरी' 'ना' मिळे नवऱ्याला!


प्रशासक न्यूज, दि. ९जुलै

लग्न न जमणाऱ्या तरुणांची संख्या अलीकडे वाढली आहे त्याचाच गैरफायदा घेत लग्नासाठी नवरी बघून देतो म्हणून लाखो रुपये मुलाच्या घरच्यांकडून घेऊन लग्न झाल्यावर दोन तीन दिवसात तिथून पोबारा करायचा आणि मुलाची आर्थिक फसवणूक करायची अशी बनावट लग्न करून आर्थिक फसवणूक करणाऱ्यांची सात जणांची टोळी श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केली आहे यात दोन महिला पाच पुरुषांचा समावेश आहे ही सर्व टोळी यवतमाळ जिल्ह्यातील आहे

श्रीगोंदा पोलिसांनी पकडलेल्या या टोळीकडून रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन चारचाकी गाड्या असा एकूण १३,०७,८००रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे
लग्न झाल्यानंतर तीनच दिवसात नोटरी करण्याच्या निमित्ताने श्रीगोंद्यात येऊन तिथून सासूच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पळून जाण्याचा प्रयत्न नववधु आणि तिच्या आईने केला होता परंतु श्रीगोंदा न्यायालसमोर ही घटना घडल्यामुळे याचा मोठा गाजावाजा झाला आणि पोलिसांनी या नववधू तिची आई आणि अजून दोन लोकांना ताब्यात घेतले होते त्यावेळी नितीन अशोक उगले रा मूंगूसगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आशा गौतम पाटील, सिमरन गौतम पाटील, रा चोरंबा, ता घाटंजी, जि. यवतमाळ आणि शेख शाहरुख शेख फरीद, दीपक पांडुरंग देशमुख या चार जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला होता

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ मुकेश बडे व त्यांचे मदतनीस पो कॉ प्रवीण गारुडकर, पो कॉ आनंद मैड, पो कॉ संभाजी गर्जे, म पो कॉ अरुणा खेडकर, म पो कॉ अस्मिता शेळके(खेतमाळीस)यांनी सुरु केला

उगले यांनी मध्यस्थी दलाला ला २,१५,०००रुपये देऊन सिमरन पाटील हिच्याशी विवाह केला पण त्यानंतर तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला या प्रकरणाचा तपास करत असताना सदर ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे कसून चौकशी केली असता हे आरोपी संगणमत करून लग्न न झालेल्या मुलांचा शोध घ्यायचे त्यांची परिस्थिती पाहून त्यांच्याकडून लाखो रुपये घ्यायचे मग त्यांचं साध्या पद्धतीने लग्न व्हायचं आणि त्यानंतर उरलेल्या साथीदारांच्या मदतीने सदर मुलगी ही पळून जायची तपासात या आरोपीन सोबत अर्जुन रामराव पाटील उर्फ कर्णन गौतम पाटील रा चोरंबा ता घाटंजी जि. यवतमाळ, सचिन बलदेव राठोड उर्फ राजू रामराव राठोड रा वरुड, ता. पुसद, जि यवतमाळ, युवराज नामदेव जाधव रा नंदपूर मोहा,ता.पुसद जि. यवतमाळ हे देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले तपास पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे यवतमाळ जिल्ह्यातून या आरोपीना ताब्यात घेतले आहे

*आई,बहीण,भाऊ मिळून करत होते फसवणूक*
आर्थिक फसवणूक करून बनावट लग्न करणाऱ्या या टोळीचे प्रमुख म्होरक्या असलेले नवरी सिमरन पाटील ही तिची आई आशा आणि भाऊ कर्णन यांच्या मदतीने ही फसवणूक करत होती यात त्यांना बाकीचे दलाल व त्यांचे सहकारी मदत करायचे यातील काही जण लग्न जमत नसलेले लग्नासाठी रखडलेले मुलं गाठायचे त्यांना लग्नाचे आमिष दाखवायचे आणि आपल्या जाळ्यात अडकवायचे

*बाप रे नवरी एक आणि लग्न नऊ*
सदर टोळीच्या मदतीने सिमरन हिने या आधी एकूण आठ लग्न केली असून फिर्यादी नितीन उगले यांच्या सोबतचे हे नववे लग्न होते या आधी या टोळीने तेलंगना,गुजरात अश्या विविध राज्यात लाखो रुपये घेऊन अनेकांना बनावट लग्न करून गंडा घातला आहे यातील गुजरात मधील एका उद्योजकला आठ लाख रु तर नगर मधील एकाला ५ लाख रुपयांना गंडा घातला आहे परंतु इज्जती च्या भीतीने या आधी कुणी तक्रार देण्यास पुढे आले नाही आणि या टोळीचे फावत गेले

*अश्या दलालांपासून सावधान*
अश्या प्रकारे बनावट लग्न करून फसवणूकीचे प्रकार श्रीगोंदा तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडतं आहेत त्यामुळे अश्या अनोळखी दलालनापासून सावध राहणे जरुरी आहे लग्न जमत नसलेल्या मुलांच्या भावनेचा गैरफायदा घेत हे लोक लाखो रुपये मुलाच्या घरच्यांकडून घेऊन लग्न लावून द्यायचे आणि लग्न झाल्यावर तीन चार दिवसातच तिथून पळ काढायचे त्यामुळे इथून पुढ असल्या लोकांपासून सावध राहून मुलीची खात्री करूनच लग्न करणे गरजेचे आहे

लाखो रुपये दिले एजंटला,तरी 'नवरी' 'ना' मिळे नवऱ्याला! लाखो रुपये दिले एजंटला,तरी 'नवरी' 'ना' मिळे नवऱ्याला! Reviewed by Prashasak on जुलै ०९, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.