प्रशासक न्यूज,दि१६जून
विशाल अ चव्हाण
श्रीगोंदा शहर ही संतांची भूमी,बारा महादेव आणि तेराव ज्योतिर्लिंग अशी ख्याती असलेले हे शहर पण गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच समस्येने इथले नागरिक त्रस्त झाले होते माणूस मेल्यानंतर दहा दिवसांनी कराव्या लागणाऱ्या त्याच्या दशक्रियाविधीच्या दिवशी काकस्पर्शच होत नसल्यामुळे लोक नाराज झाले होते आणि त्यामुळे श्रीगोंदा शहरातील दशक्रियाविधी बाहेरगावी व्हायला लागले होते आपल्या संस्कृतीत काकस्पर्श झाला म्हणजे मयत व्यक्तीला मोक्ष मिळाला अशी धारणा आहे त्यामुळे काकस्पर्शाला मोठं महत्व आहे श्रीगोंद्यातील लोक काकस्पर्श लवकर होतो म्हणून सिद्धटेक,श्रीगोंदा कारखाना अश्या ठिकाणी जाऊन दशक्रियाविधी करायला लागले होते
दशक्रिया विधी बाहेरगावी जायला लागल्यामुळे त्याठिकाणी जाण्यायेण्यासाठी लोकांचा वाया जाणारा वेळ,खर्च होणारा पैसा,या दशक्रिया विधिशी निगडित शहरातील छोट्या छोट्या व्यवसायिकांचे होणारे आर्थिक नुकसान या सर्व गोष्टी विचारात घेऊन व संतांची भूमी असूनही दहावे बाहेर जात असल्यामुळे शहराचा कमी होणारा नावलौकीक या सर्व बाबींचा विचार करून हे दशक्रिया विधी बाहेरगावी न जाता गावातच व्हावेत आणि त्यासाठी शहरातील दशक्रिया विधीच्या ठिकाणी काकस्पर्श व्हावा यासाठी शहरातील ह.भ.प.अशोक महाराज आळेकर यांनी पुढकार घेतला काकस्पर्श होण्यासाठी त्यांनी एक नामी शक्कल लढवली यात त्यांना भाऊसाहेब खेतमाळीस,बाळू बाजीराव खेतमाळीस, नानासाहेब कोथिंबीरे आणि स्मशान भूमीत काम करणारे स्मशान जोगी यांनी मोलाची साथ दिली
*अशी लढवली शक्कल*
दशक्रिया विधीच्या ठिकाणी कावळेच येत नसल्यामुळे काकस्पर्श होत नव्हता त्यामुळे याठिकाणी कावळे यावेत म्हणून त्यांना आकर्षित करण्यासाठी अशोक आळेकर व त्यांच्या सहकाऱ्यानी मागच्या महिन्यात दि.१८मे रोजी शहरातील दशक्रिया विधी होत असलेल्या ठिकाणी सकाळी लवकर जाऊन कावळयांना आकर्षित करण्यासाठी तिथे भेळ मुरमुरे टाकले त्यानंतर एक दोन दिवस असाच प्रयोग केल्यावर पण फारसा फरक दिसेना मग त्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी सकाळी लवकर जाऊन दशक्रिया विधी चा देखावा सादर करण्यास सुरुवात केली मग त्यात त्यांनी दशक्रिया विधिसाठी केले जाणारे पिंडदान,दही भात ठेवणे,धूर करणे प्रवचन करणे,तोंडाने कावळ्यांचा आवाज काढणे,स्पीकरवर कावळ्यांचा आवाज लावणे असे प्रयोग राबवायला सुरुवात केली त्यानंतर चार ते पाच दिवस दररोज असे डमी दशक्रिया केल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्याठिकाणी कावळे यायला लागले
*लोकांना आवाहन*
प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ह भ प अशोक महाराज आळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांना याठिकाणी काकस्पर्श होत आहे दशक्रियाविधी साठी बाहेरगावी जाऊ नका असे आवाहन केले त्यांच्या आवाहानाला काही कुटुंबांनी प्रतिसाद देत त्यांच्या घरातील मयत व्यक्तीचे दहावे याठिकाणी केले असता तिथे लगेच काकस्पर्श झाला
*मोफत प्रवचनसेवा आणि शहरात दशक्रिया विधी करण्यासाठी जनजागृती*
शहरातील दशक्रिया विधी बाहेरगावी जाऊ नये म्हणून हा प्रयोग ज्यांच्या संकल्पनेतून राबवला गेला असे अशोक महाराज आळेकर हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून ते सामाजिक कार्य म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमात मोफत प्रवचनसेवा सादर करतात एक रूपया मानधन न घेता त्यांनी आतापर्यत २०३ प्रवचने केली आहेत त्यातून ते समाजप्रबोधनाचे काम करत आहेत श्रीगोंदा शहरात दहावे व्हावेत यासाठी ते आपल्या प्रवचनातून तसेच सोशल मीडिया अश्या वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करत आहेत
अश्या प्रकारे काकस्पर्श होण्यासाठी या सर्वांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक होत असून या आयडियाच्या कल्पनेची देखील चर्चा होत आहे
श्रीगोंद्यातील 'या' गोष्टीसाठी राबवलेल्या 'त्या' आयडियाच्या कल्पनेची सर्वत्र चर्चा!
Reviewed by Prashasak
on
जून १६, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: