प्रशासक न्यूज,दि.२९जून
श्रीगोंदा शहरात मागील काही दिवसांपासून सुरु झालेले चोऱ्यांचे सत्र थांबण्या ऐवजी दररोज त्या घटनेत वाढ होत आहे शहरातील गजबजलेल्या वस्तीत चोरट्यानीं दगडफेक करत धुमाकूळ घातल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच आज मध्यरात्री पुन्हा चोरट्यानीं शहरात धुमाकूळ घातला आहे
शहरातील दौंड जामखेड रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्थानका जवळील हॉटेल वैभव सह तेथील दोन दुकानें चोरट्यानीं फोडली तसेच याच रस्त्याच्या बाजूला असलेल्या नवजीवन कॉम्प्लेक्स मधील तीन दुकानें चोरट्यानीं फोडली असून बँक ऑफ महाराष्ट्र च्या खाली असलेला एक फोटो स्टुडियो सुद्धा चोरट्यानीं लक्ष केल्याची माहिती आहे
आज मध्यरात्री मुख्य रस्त्याच्या बाजूची एकूण सात दुकानें चोरट्यानीं फोडत धाडसी चोरी केल्यामुळे आज सकाळीच व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे चोऱ्यांचे हे सत्र थांबवण्याचे पोलिसांसमोर आवाहन उभे ठाकले आहे
श्रीगोंदा शहरात पुन्हा धुमाकूळ, हे सत्र कधी थांबणार!
Reviewed by Prashasak
on
जून २८, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: