पुरवठा विभागातील गर्दी हटेना,तहसील मधल्या अधिकाऱ्यांना काही घाम फुटेना!


प्रशासक न्यूज,दि.१०जून २०२४

श्रीगोंदा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात सुरु असलेला सावळा गोंधळ काही केल्या थांबताना दिसत नाही तालुक्यातील अनेक सामान्य लोक या कार्यालयात कामासाठी हेलपाटे मारून मेटाकुटीस आले आहेत त्यामुळे आता नेमकी दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न सामन्य लोकांसमोर उभा ठाकला आहे

नवीन रेशनींग कुपन काढणे,कुपणातील नाव कमी करणे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत नाव समाविष्ट करणे या व अश्या विविध कामांसाठी श्रीगोंदा तालुक्यातून नागरिक तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात मोठ्या संख्येने येतात पुरवठा विभागात कुपन ऑनलाईन करण्यासाठी दोन खासगी ऑपरेटर नेमण्यात आले आहेत परंतु तरीसुद्धा कामाचा वेग मंदावलेलाच आहे परंतु या प्रश्नात या मागे सुद्धा श्रीगोंदा तहसीलदारांचे लक्ष वेधले होते त्यावेळी त्यांनी रेशनींग च्या कामात सुसूत्रता आणली जाईल असे सांगितले होते परंतु रेशनींग च्या कामासाठी या कार्यालयात हेलपाटे मारणाऱ्यांची संख्या वाढतच आहे
कौठा गावातील आकाश लोंढे यांनी त्यांचे विभक्त कुपन करण्यासाठी अर्ज देऊन सहा महिने झालेत तरी सुद्धा अजून पुरवठा विभागाकडून त्यांना फक्त आठ दिवसाने या एवढंच सांगितलं जात आहे यांच्या प्रमाणेच अनेक वयोवृद्ध नागरिक,महिला यांची किरकोळ कामासाठी झालेली मोठी गर्दी याठिकाणी बघायला मिळते तालुक्यातील अनेक नागरिक पुरवठा विभागाच्या या भोंगळ कारभाराला वैतागले आहेत परंतु या प्रश्नात कुणाकडे दाद मागायची हाच प्रश्न तालुक्यातील लोकांपुढे आहे
*दलालांचा विळखा,आर्थिक लूट*
तहसील कार्यालयात विविध कामांसाठी हेलपाटे मारूनसुद्धा लोकांची कामे होत नाहीत त्यामुळे वैतागून लोकांना दलालांचा आधार घ्यावा लागत आहे किरकोळ कामासाठी दलाल मोठी रक्कम आकारत आहेत परंतु पैसे दिल्यावर सुद्धा कामे होत नाहीत दलालांकडून गरीब लोकांच्या मजबुरीचा फायदा घेत आर्थिक लूट होत आहे तसेच तहसील मध्ये चेहेरे बघून कामे केली जात असल्याची तक्रार देखील नागरिक करत आहे

*शासन आपल्या दारी,सामान्य जनता वाऱ्यावरी*
एकीकडे शासन सामन्य लोकांची शासकीय कामे तत्काळ व्हावित यासाठी शासन आपल्या दारीं योजना राबवत आहे त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत परंतु श्रीगोंद्यात मात्र प्रशासनावर कुणाचाच धाक उरलेला नसून शासन आपल्या दारीं पण जनता मात्र वाऱ्यावर अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे

*सामान्य लोकांची या प्रश्नातून सुटका होणार कधी?*
श्रीगोंदा तालुक्याला महेंद्र माळी, मिलिंद कुलथे यांच्यासारखे कार्यक्षम तहसीलदार लाभले होते त्यांनी रेशनींग च्या प्रश्नाबाबत लक्ष देऊन चांगले काम केले होते परंतु आता मात्र नागरिकांची कामे होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे

*सूचना करू*
या प्रश्नाबाबत श्रीगोंदा तहसीलदार वाघमारे म्याडम यांना विचारले असता पुरवठा विभागाला सूचना करू असे चौकटीतले उत्तर त्यांनी दिले

*पदभार आताच स्वीकारलाय*
पुरवठा अधिकारी जाधव यांना पुरवठा विभागात लोकांची कामे मार्गी लागत नसल्याबाबत विचारले असता त्यांनी मी आताच पदभार स्विकारल्याचे सांगितले



पुरवठा विभागातील गर्दी हटेना,तहसील मधल्या अधिकाऱ्यांना काही घाम फुटेना! पुरवठा विभागातील गर्दी हटेना,तहसील मधल्या अधिकाऱ्यांना काही घाम फुटेना! Reviewed by Prashasak on जून १०, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.