प्रशासक न्यूज,दि.१८मे २०२४
आरोपीला कर्जाऊ दिलेली रक्कम कायदेशीर देणे लागत असल्याचे सिद्ध न करू शकल्यामुळे कलम १३८च्या प्रकरणातून एका आरोपीची निर्दोष मुक्तता झाली आहे श्रीगोंदा मुख्य न्यायदंडाधिकारी एन एस काकडे यांनी हा निकाल दिला आहे सदर केस ७ वर्षे ३महिने १३दिवस चालली
आरोपीच्या वतीने केसचे कामकाज ऍड स्वानंद पी राऊत यांनी व त्यांचे सहकारी ऍड दामू वडवकर,ऍड अमित वाळुंज यांनी पहिले
श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील पांडुरंग एकनाथ चव्हाण यांनी कर्जाचे हप्ते भरले नाहीत व थकीत कर्जाचे परतफेडी पोटी ९,३०,०००रुपये रकमेचा धनादेश अनादरीत केल्यामुळे २०१७ साली श्रीगोंदा शहरातील बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेने श्रीगोंदा येथील फौजदारी कोर्टात त्यांच्याविरुद्ध निगोशीयेबल इन्स्ट्युमेंट ऍक्ट चे कलम १३८नुसार क्रिमिनल केस दाखल केली होती
परंतु सदर पतसंस्था सदर व्यक्ती सदर रक्कम कायदेशीर देणे लागतो हे सिद्ध न करू शकल्यामुळे आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे
पतसंस्थेच्या चेक बाऊन्स प्रकरणातून निर्दोष मुक्तता
Reviewed by Prashasak
on
मे १८, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: