प्रशासक न्यूज,दि.२३एप्रिल
सध्या सगळीकडे उन्हाची तीव्रता वाढली आहे तापमानाचा पारा रोज नवीन नवीन रेकॉर्ड स्थापित करीत आहे असे असतानाच श्रीगोंदा शहरात मागील काही दिवसांपासून लाईट जाण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे आधीच उकाड्याने त्रासलेली जनता विजेच्या लपंडावामुळे हैराण झाली आहे एकीकडे वीज जाण्याचे प्रमाण वाढलेले असतानाच दुसरीकडे मात्र विजमंडळाकडून मोठ्या रकमेची बिल आकारणी वीज ग्राहकांना केली जात आहे त्यामुळे सध्या श्रीगोंदेकरांची अवस्था बत्ती गूल मीटर चालू अशीच झाली आहे
विजेच्या या अचानक जाण्याच्या समस्येबाबत श्रीगोंदा विजमंडळाचे अभियंता कवरे यांना विचारले असता १३२केव्ही वरील एक केबल खराब झाली असून संपूर्ण लोड एकाच केबल वर आहे केबल दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे वीज ये जा करत आहे दोन तीन दिवसात केबल दुरुस्तीचे काम पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले
*कारवाईत भेदभाव नाही,सरसकट बिल आकारणी*
चोरून वीज वापरणाऱ्यावर कारवाई करताना आर्थिक तडजोड होऊन कारवाईत भेदभाव होत असल्याबाबत कावरे यांना विचारले असता त्यांनी असा कोणताही प्रकार होत नसल्याचे सांगून सर्वांना वीज बिल आकारणी केली जात असल्याचे सांगितले
*फोन उचलत नाहीत,माहिती देत नसल्याबाबत अभियंत्यांवर नाराजी*
शहरात सुरु असलेल्या विजेच्या लपंडावा बाबत विचारणा करण्यासाठी शहर अभियंता कवरे यांना फोन केला असता ते फोन उचलत नाहीत योग्य उत्तरे देत नाहीत अश्या तक्रारी देखील त्यांच्याबद्दल असून काही नगरसेवकांनी देखील कवरे यांच्या कार्यपद्धती बाबत नाराजी व्यक्त केली आहे याबाबत त्यांना विचारणा केली असता कामाच्या गडबडीत फोन उचलण्यात आला नसेल इतरवेळेस आपण सर्वांचे फोन उचलतो असे त्यांनी सांगितले
श्रीगोंदा शहरात बत्ती गूल मीटर चालू अशी अवस्था,विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण
Reviewed by Prashasak
on
एप्रिल २२, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: