या प्रश्नावर लोकप्रतिनिधींसह,कारखानदार गप्प का?...असे झाले तर कालवा बुजवला जाईल ... घनश्याम शेलार आक्रमक!
राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कुकडी डाव्या कालव्या बाबत सरकारकडे केलेल्या मागण्या गंभीर असून त्या मागण्या दबावात येऊन सरकारने जर मान्य केल्या तर श्रीगोंदा,पारनेर,कर्जत आणि करमाळा तालुक्यातील कुकडीच्या पाण्यावर अवलंबून असलेला शेतकरी उध्वस्त होईल आणि वळसे पाटलांच्या मागण्या पूर्ण झाल्यास भविष्यात कुकडी कालवाच बुजवला जाऊ शकतो अशी गंभीर शक्यता व्यक्त करतानाच एवढं सगळं होत असताना शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या प्रश्नाबाबत श्रीगोंदा तालुक्याचे लोकप्रतिनिधी व दोन्ही कारखान्याचे अध्यक्ष जे कालवा सल्लागार समितीचे पदसिद्ध सदस्य असतात ते मूग गिळून गप्प का बसलेत याबाबत काँग्रेस पक्षाचे नेते घनश्याम शेलार यांनी प्रश्न उपस्थितीत करत तालुक्याच्या लोकप्रतिधीनिधीच्या निष्क्रियतेवर सडकून टीका केली
शेलार यांनी आज त्यांच्या श्रीगोंदा शहरातील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यात ते बोलत होते या पत्रकार परिषदेसाठी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर,संजय आनंदकर,आजिम जकाते उपस्थित होते
यावेळी घनश्याम शेलार यांनी कुकडीच्या पाणी प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका मांडली चुकीच्या राजकारणामुळे वळसे पाटलांचे धाडस वाढल्याची सांगतानाच डिंभे-माणिकडोह बोगदा संयुक्त प्रकल्पात नसल्यामुळे तो होऊ नये असे वळसे पाटील सांगतात मग ते ज्या ६५ बांधाऱ्यांचा कुकडी डाव्या कालव्यात समावेश करा असे सांगतात तसेच २.५ टी एम सी पाणी ते या बांधाऱ्यांसाठी मागतात त्याची तरी कुठे संयुक्त प्रकल्पात तरतूद आहे त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्या मागण्या पूर्णतः चुकीच्या आणि नगर व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आहेत असे स्पष्ट मत शेलार यांनी यावेळी मांडले
*नाव न घेता आ पाचपुते यांच्यावर टीका*
तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांना या प्रश्नाच गांभीर्य नाही वळसे पाटलांनी २५ जून ला पत्र दिल्यावर आपल्या आमदारांनी नेहमीप्रमाणे एक दिवस आधीची तारीख टाकून दिखावू पणासाठी पत्र दिले त्यांना या प्रश्नाच गंभीर्य नाही,त्यांनी कुकडी प्रमाणेच घोडच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे तालुक्याचे वाळवंट झाले लोकप्रतिनिधीना विकासकामांमध्ये रस नसून त्यांचा रस दुसऱ्याच गोष्टींमध्ये असल्याची टीका शेलार यांनी केली
*शेतकऱ्यांनी जागरूक व्हाव*
डिंभे माणिकडोह बोगदा झालाच पाहिजे अन्यथा शेतकरी उध्वस्त होईल,वळसे पाटलांच्या मागण्या मंजूर होऊ नयेत यासाठी आणि कुकडी डावा कालवा वाचवण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जागरूक होऊन एकत्र यावं या प्रश्नावर मोठा लढा उभारण्याची तयारी शेलार यांनी दाखवली
*मोठ्या पवारांसह,थोरातांची मदत घेणार*
दिलीप वळसे पाटील हे मोठे नेते असून ते मंत्री आहेत त्यांचे सरकारमध्ये वजन आहे त्यामुळे त्यांना विरोध करण्यासाठी आंदोलना सोबतच थेट सरकार वर दबाव आणावा लागेल यासाठी आपण काय करणार असा प्रश्न विचारला असता आपण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना या प्रश्नात लक्ष घालण्यास सांगणार असून या दोघांची मदत घेणार असल्याचे शेलार यांनी सांगितले
या प्रश्नावर लोकप्रतिनिधींसह,कारखानदार गप्प का?...असे झाले तर कालवा बुजवला जाईल ... घनश्याम शेलार आक्रमक!
Reviewed by Prashasak
on
जुलै २०, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: