आण्णांची राजकीय गुगली,आता देणार पंजाला साथ!


प्रशासक न्यूज,दि.१०एप्रिल
विशाल चव्हाण 

बी आर एस पक्षाचे नेते घनश्याम शेलार यांनी आज शहरातील तुळशीदास मंगल कार्यालयात घेतलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बी आर एस पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले त्यानंतर कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली कार्यकर्ते आपली मते व्यक्त करत असतानाच अचानक त्या ठिकाणी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावली थोरात यांचे असे अचानक येणे सर्वांसाठीच भूवया उंचावणारे होते होते त्यानंतर काही वेळातच घनश्याम शेलार यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला शेलार यांच्या पक्षप्रवेशामुळे श्रीगोंद्यात काँग्रेसला ताकद मिळणार असून महाविकास आघाडीला बळकटी मिळणार आहे
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले कि संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्या सामान्य मतदारांनी प्रथापिताना मदत करण्याऐवजी सामान्य कार्यकरत्याला निवडून देणे गरजेचे आहे यावेळी त्यांनी घनश्याम शेलार यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देत त्यांचं स्वागत केल

शेलार यांची राजकीय गुगली
आज मेळावा घेऊन शेलार बीआरएस पक्ष सोडतील याचा सर्वांना अंदाज आला होता परंतु त्यानंतर ते शरद पवार गटात प्रवेश करतील असे सर्वांना वाटतं असतानाच शेलार यांनी थोरातांच्या उपस्थितीत केलेला प्रवेश हा सर्वांसाठीच राजकीय धक्का होता

घनश्याम शेलार यांनी आज मला आपल्याशी बोलायचंय या आशयाखाली कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी बोलताना घनश्याम शेलार यांनी १९८४ सालापासून पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांचा सुरू झालेला राजकीय प्रवास ते आज तागायत पर्यंतच्या घडलेल्या त्यांच्या आयुष्यातील सर्व राजकीय घडामोडी यावर प्रकाशझोत टाकत विरोधकांकडून सातत्याने त्यांची होणारी बदनामी करण्यात येणारे चुकीचे आरोप या सर्वांचे खंडन करत आपल्या स्टाइलने या सर्व आरोपांना उत्तर दिले
ज्यावेळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप पक्षाच्या सभा होत नव्हत्या त्या वेळी आपण भाजप जिल्हा युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून भाजप पक्षाची मोर्चे बांधणी केली त्याची दखल घेऊन मला १९९९साली पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यानंतर गडबड झाली
चौकट/-स्व.बाळासाहेब विखे यांच्यामुळे माझे तिकीट कापले गेले पण बदनामी माझी केली
मला उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब विखे हे शिवसेनेत होते सर्व पक्ष आपल्याच खिशात असल्याची भावना विखे कुटुंबाची नेहमीच राहिलेली आहे त्यावेळी सुद्धा काँग्रेसने बाबासाहेब भोस यांना लोकसभेची उमेदवारी दिली त्यामुळे स्व बाळासाहेब विखे यांनी आता घनश्याम शेलार निवडून येणार नाहीत उमेदवारी बदला असे भाजप नेत्यांना सांगितले त्यामुळे तेव्हा आपली उमेदवारी ऐनवेळी बदलण्यात आली

त्यानंतर आपण भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यामुळे माझ्यावर मी विकलो गेलो मॅनेज झालो असे गंभीर आरोप करण्यात आले परंतु त्यावेळी शरद पवार यांनी स्वतः माझ्या घरी येऊन राष्ट्रवादीत येण्याचे आमंत्रण दिले त्यामुळे आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला राष्ट्रवादीत प्रामाणिक काम करून सुद्धा माझ्यावर अन्याय झाला विधानसभा लढवण्यासाठी शिवसेनेत गेलो पण भाजप शिवसेना युती झाल्यामुळे माझे पुन्हा नुकसान झाले त्यानंतर मी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला चांगलं काम करून सुद्धा मला न्याय मिळाला नाही

*चांगल काम करणाऱ्याच फक्त कौतुक,ज्या व्यक्तीमुळे पराभव त्याच्यावर पदांचा वर्षाव म्हणून राष्ट्रवादी सोडावी लागली *
शिवसेनेतून राष्ट्रवादीत पुन्हा गेल्यानंतर मी प्रामाणिक काम केले त्या वेळेचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी कारखान्याच्या अडचणीमुळे विधानसभा लढवण्यास नकार दिला त्यानंतर ऐनवेळी मला विधानसभा लढवण्यास पक्षाकडून सांगण्यात आले तरी मी लढलो परंतु त्यानंतर ज्या व्यक्तीमुळे माझा विधानसभेला पराभव झाला त्या व्यक्तीवर पदांची खैरात करण्यात आली त्यांना राज्याची पदे बहाल केली गेली असे नाव न घेता बाळासाहेब नहाटा यांच्यावर शेलार यांनी टीका केली आणि मी पक्षाशी प्रामाणिक राहून माझ्या वाट्याला मात्र फक्त कौतुकच आले मला दिलेला कोणताही शब्द मात्र पाळण्यात आला नाही त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही त्यानंतर अजित पवार यांच्याशी चर्चा केली पण त्यांनीही मला म्हणावा तसा प्रतिसाद न दिल्यामुळे शेतकरी हिताचा विचार करून मी राष्ट्रवादी सोडून पुन्हा बी आर एस मध्ये प्रवेश केला असे त्यांनी सांगितले

अशाप्रकारे शेलार यांनी आपल्या आतापर्यंतच्या पक्षांतराचा राजकीय प्रवास सर्वांसमोर उलगडला आणि महाराष्ट्रात बी आर एस चा अजून एवढा प्रभाव नसल्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आज आपण बी आर एस पक्षाचा राजीनामा देत असल्याचे घनश्याम शेलार यांनी जाहीर केले
*आणि शेलार भावनिक अश्रू अनावर*
मी सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता असल्यामुळे माझ्यावर नेहमी खालच्या पातळीवरचे आरोप झाले २०१९ च्या विधानसभा निवडणुकीला पक्षाकडून आलेले पाच कोटी रुपये मी घरात दाबून ठेवले ते खर्च केले नाहीत म्हणून माझा पराभव झाला अशी देखील माझी बदनामी करण्यात आली मी जेव्हा जेव्हा पक्ष बदलला त्यावेळी माझ्यावरती मी मॅनेज झालो विकला गेलो असे आरोप झाले पण आपण कुणाच्या एक रुपयाला मिंधा नसल्याचे शेलार यांनी आपल्या मुलांची शपथ घेऊन सांगत त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले यावेळी मात्र शेलार भावनिक झाले आणि भर सभेतच त्यांना अश्रू अनावर झाले
कृष्णा खोऱ्यातील कुकडी डाव्या कालव्याचे काम माझ्या पाठपुराव्यामुळे झाल्याचे सांगतानाच तालुक्यातील तीनही साखर कारखान्यांनी १४ दिवसाच्या आत शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यामुळे आपण त्यांची तक्रार केलेली आहे असं सांगतानाच कुकडीच्या पाणी प्रश्नावर मात्र तालुक्यातील सर्व नेते गप्प का असा प्रश्न उपस्थित केला
नागवडे,पाचपुते यांच्यावर देखील टीका
आज बोलताना शेलार यांनी आ बबनराव पाचपुते यांनी सुद्धा आपण एकाच पक्षात असताना आपली कशी राजकीय कोंडी केले हे सांगत नागवडे यांनी सुद्धा आपल्याला ऐनवेळी साथ न देता फक्त आपल्या संस्थांना महत्व दिल्याची टीका केली

*विधानसभा लढवायला निघाले शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही दिलेत का ते सांगा नाव न घेता माजी आमदार राहुल जगताप यांना सवाल*
मी कुठल्याही परिस्थितीत विधानसभा लढवणार आहे समोर कोण उमेदवार येईल ते वेळेला बघू कारखान्याच्या अडचणीमुळे निवडणूक न लढवणारे आता विधानसभा लढवण्याच्या गप्पा करत आहेत परंतु त्यांनी करांच्या उसाचे पैसे दिलेत का त्यांच्या अडचण सुटली का हे आधी सांगावं असे म्हणत तर शेलार यांनी राहुल जगताप यांचे नाव न घेता टीका केली

आजच्या या मेळाव्यासाठी ऍड विठ्ठलराव काकडे,उत्तम नागवडे,भाऊसाहेब खेतमाळीस,गोपाळराव मोटे,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे,माजी सभापती विलास भैलुमे,अनिल बोरुडे,माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते

आण्णांची राजकीय गुगली,आता देणार पंजाला साथ! आण्णांची राजकीय गुगली,आता देणार पंजाला साथ! Reviewed by Prashasak on एप्रिल १०, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.