प्रशासक न्यूज,दि.१५एप्रिल
वाहतूक कोंडी झाल्यामुळे रस्त्यात वाद घालू नका बाजूला जा असे सांगितल्याच्या रागातून एका २७ वर्षीय तरुणाच्या डोक्यात लोखंडी कोयता मारून त्याला जखमी केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक ते लोणीव्यंकनाथ रस्त्यावर रेल्वेगेट नं १२पुलाजवळ काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे
सदर घटनेबाबत आण्णा बाबू गायकवाड रा.श्रीगोंदा कारखाना यांच्या फिर्यादीवरून सलीम जाहीद पिजांरी,राधेशाम कदम दोघे रा.मदनवाडी, भिगवन ता.इंदापुर जि.पुणे, सत्यम शशीकांत रावत रा.रुईगाव एम आय डी सी,बारामती आणि अमृता अविनाश राणे रा.ठाणे या चार जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन यातील आरोपीना ताब्यात घेतले आहे
फिर्यादित म्हंटल्याप्रमाणे फिर्यादी गायकवाड हे काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पारगाव ते लोणीव्यंकनाथ रस्त्याने जात असताना १२ नंबर रेल्वेगेट पुला जवळ वाहतूक कोंडी झाल्यामुळे ते दुचाकी बाजूला लावून वाहतूक कोंडी का झाली हे पाहण्यासाठी गेले असता वरील आरोपी हे लोणीव्यंकनाथ गावातील इसमासोबत वाद घालत होते त्यामुळे गायकवाड यांनी त्यांना तुम्ही रस्त्यातून बाजूला जा वाहतूक कोंडी झाली आहे असे समाजावून सांगितले त्याचा राग आल्यामुळे सलीम पिंजारी याने गायकवाड यांच्या डोक्यात लोखंडी कोयता मारून त्यांना जखमी केले त्याचवेळी त्याच्यासोबत असलेल्या इतर आरोपीनी त्यांना मारहाण करत गावातील लोकांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली
पुढील तपास पो ना ज्ञानेश्वर भागवत हे करत आहेत
रस्त्यातून बाजूला व्हा सांगितल्याचा आला राग आणि....
Reviewed by Prashasak
on
एप्रिल १५, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: